अमळनेर तालुक्यातील गडखांब येथील अपघातात मृत व्यातीचा वारसांना 68लाख  भरपाई देण्याचे आदेश #दिला अॅड महेंद्र सोमा चौधरी यांचा लढयाला यश …

अमळनेर तालुक्यातील गडखांब येथील अपघातात मृत व्यातीचा वारसांना 68लाख  भरपाई देण्याचे आदेश #दिला अॅड महेंद्र सोमा चौधरी यांचा लढयाला यश …

जळगावाहून विशाखापट्टणम येथे जात असता अपघातात ठार झालेल्या महेश खुशाल बोढरे यांच्या पत्नीला ४२ लाख ८३ हजार रुपये तर दुसरे मयत मृत्यू झाला. नारायण खंडू मिस्तरी यांच्या पत्नीला १९ लाख ४८ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी विमा कंपनीला दिले.

महेश खुशाल बोढरे तसेच त्यांचे सहकारी चालक नारायण खंडू मिस्तरी (सुतार) दोघं रा, गडखांब, ता. अमळनेर हे जळगाव येथून अकोलामार्गे वाहनाने (क्र. एमएच १८ बीजी २४७३) विशाखापट्टणम येथे माल घेवून जात होते. त्यावेळी त्यांचे वाहन व कंटेनर
(क्र. एचआर ३८, एक्स ८५८१) यांचा १४ जानेवारी २०१९ रोजी मालेगाव, जिल्हा वाशिम येथे अपघात झाला. यामध्ये ट्रक मालक महेश बोढरे तसेच चालक नारायण मिस्तरी यांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता.

दोन्ही मयतांच्या पत्नी रुपाली महेश पाटील व संगीता नारायण मिस्तरी यांनी स्वतः व मयताच्या इतर वारसासाठी नुकसान भरपाईची रक्कम- मिळण्यासाठी अॅड. महेंद्र सोमा चौधरी यांच्यातर्फे नुकसान भरपाई अर्ज दाखल केला होता. युक्तिवादानंतर नुकसान भरपाई देण्याचे आदेश अपघात न्यायालयाचे चेअरमन तथा मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.क्यू. एस. एम. शेख यांनी विमा कंपनीला दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More