बोरगाव ता. धरणगाव येथून जवळच असलेल्या भंवरखेडे येथे वीज पडून एकाच परिवारातील चार जणांसह एक महिला असे एकूण पाच जण ठार झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे

बोरगाव ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या भंवरखेडे येथे वीज पडून एकाच परिवारातील चार जणांसह एक महिला असे एकूण पाच जण ठार झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे


या संदर्भात अधिक असे कि, आज दुपारी १ वाजेच्या भंवरखेडे गावातील रघुनाथ दशरथ पाटील (वय ५०) हे आपली पत्नी अलका रघुनाथ पाटील (वय ४५), सून लता उदय पाटील (वय ३५), दुसरी सून शोभा भागवत पाटील (वय ४०) व गावातील रोजंदारीवरील महिला कल्पना भैय्या पाटील (वय३५) यांच्यासह ज्वारी काढण्यासाठी शेतात गेले होते. त्याचवेळी नेमका परिसरात विजेच्या गडगडासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यावेळी सर्व कुटुंब शेतातील एका झाडा खाली आश्रयासाठी थांबले. परंतू तेवढ्यात अचानक एक वीज झाडावर कोसळली. त्यात पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच धरणगाव येथून प्रशासकीय यंत्रणा भंवरखेडे येथे येण्यासाठी रवाना झाली असल्याचे कळते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More