
चोपडा विधानसभा मतदार संघात रंगणार अष्ट रंगी लढत माघारीच्या दिवशी चित्र स्पष्ट फक्त आठ उमेदवार रिंगणात
चोपडा प्रतिनिधी: चोपडा विधानसभा मतदार संघात आता अष्टरंगी लढत होणार हे चित्र स्पष्ट झाले आहे. माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी 10 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात फक्त आठ उमेदवार शिल्लक राहिले आहेत.काल अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी डी पी साळुंखे,
मगण मुरलीधर बाविस्कर ,
साहेबराव कौतिक सैदाने,
मासुम रहेमान तडवी,
अरूणा संजीव बाविस्कर,
शामकात बळीराम सोनवणे,
नरेश बळिराम सोनवणे,
धोंडीराम सिताराम भिल ,
मनीषा रविंद्र चव्हाण ,
जितेंद्र यांनी माघार घेतली आहे,त्यामुळे आता रिंगणात
जगदीशचंद्र रमेश वळवी (राष्ट्रवादी),
लताबाई चंद्रकांत सोनवणे ( शिवसेना ),
डॉ चंद्रकांत जामसिंग बारेला (अपक्ष)
प्रभाकर गोटू सोनवणे (अपक्ष)
याकूब सायबु तडवी (बहुजन समाज पार्टी )
सौ माधुरी किशोर पाटील (अपक्ष )
इश्वरलाल सुरेश कोळी ( अपक्ष )
दगडू फत्तु तडवी (अपक्ष ) एवढेच उमेदवार शिल्लक राहिले आहेत.












